Popular Posts

Monday, April 10, 2017

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सण !

ह्या वेळची होळी जरा जास्तच खास होती!
नाही, मी गावी नव्हतो गेलो! माझ्या अपार्टमेंट मधे पण नव्हतो! ना माझ्या शाळा-कॉलेज च्या मित्रांसोबत होतो!
पण तरी पण खास होळी!
बंगलोर मधे तर एवढी मोठी कधीच साजरी नव्हती केली. आणि सगळे लोक आपल्या कुटुंबासोबत आले होते हेही विशेष. ह्यात विविध राज्याचे लोक होते - कन्नड, तामिळ, मराठी, तेलगू, केरळी, बंगाली, ओडिसा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाबी ! विविध भाषिक! विविध प्रांताचे ! वैविध्यपूर्ण होळी!
कोणाला कोणाची जात माहित नाही, पण ते सर्व एकमेकांना नातेवाईकांपेक्षा जास्त ओळखतील! रोज घरी गाठी भेटी होतात! ते पण शहरात जिथे आज काल नातेवाईक एकामेकांना भेटत नसतील! स्त्रिया होत्या, पुरुष होते, पोरं होती! १० महिन्याच्या बाळापासून ते पासष्टी च्या आजी पर्यंत सगळे! अशी हि ५०-५५ कुटुंबे एकत्र आली एक मेकांच्या रंगात रंगायला! १७५ जण जमले, शाखा झाली, प्रार्थना झाली, योग्य-खेळ झाले. मग रंगोत्सव सुरु झाला! मस्त मजा केली! रंग लावले गेले! नाचलो, भिजलो, एकत्र खालो, थंडाई प्यालो! देव-देशाची गाणी गायिली गेली! कुटुंबातील जिव्हाळा आणखी वाढला गेला! मग प्रत्येक जण येणाच्या उगादी सणाच्या तयारीच्या विचारांनी घरी गेला! हे फक्त एकाच ठिकाणी झालं असं नाही तर अख्या बंगलोर भर प्रत्येक एरिया मधे झालं. आणि इतर ठिकाणी पण झालं असेल अशी खात्री आहे.
ह्यातील कोणी कोणाचा शेजारी नाही वा कोणी कोणाचा सहकारी नाही! सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात! वयाने पण सगळे लहान मोठे! तरीपण रोज एकत्र भेटी गाठी होत असतात! जेवण खाणं होत असतं!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! ह्या सगळ्यांना जोडणारा एकच दुवा! ध्येय एक ध्यास एक.
मी इथे नसतो तर माझ्या इतर बंगलोरवासियांसारखा मीपण घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर! रोज तेच चेहरे तेच काम! त्यात कसला जिव्हाळा नसतो कि आपलेपण नाही.
हे फक्त इथंच होऊ शकतं असं नाही पण फार कमी, शहरात तर मी पाहिलं नाही!
ह्यातूनही लोक बरेच प्रश्न उभे करतील! हे होते का ते होते? अमुक जातीचे होते का? तमुक धर्माचे होते का? किती होते? वगैरे वगैरे! त्याला काय तोंड नाही कि बूड नाही! जातपात विचारलेच जात नाही त्यामुळे ह्याची उत्तरं पण नाहीत!
बाकी खाकी चड्डी घालून गुंडागर्दी करणारे आम्ही संघी, असं काही ऐकायला मिळालं कि हसावं कि रडावं हि गत होते! मग कोणाचे आणि किती पूर्वग्रह दूर करत बसायचं हा विचार करून कानाडोळा करतो. पण आज जरा सांगावंसं वाटलं म्हणून तसदी घेतली! संघाबद्दल जे लिहिलं जातं, बोललं जातं ते सत्यापासून किती दूर आणि विक्षिप्त आहे हे सांगायचा एक प्रयत्न! सकारात्मकता वाढावी आणि लोकांनी RSS मधेच नाही तर इतर कुठे का होईना एकत्र येऊन सण साजरे करावेत, एकी राहावी! हा विचार जावा ह्या हेतूने हे लिहितोय!
- आलासकर