Popular Posts

Monday, December 31, 2012


Done with a long week end holiday and joined office today! Office is not as much boring as it used to be when I used to go home for long vacations! Just because spent most of  my time reading books in crosswords. Its FREE! :) And there is not much to do here in office! And who cares if there is any work on 31st December??? LoL

Started by picking up random books from the store until I get fond of reading (m not yet)! I like reading but this time I was poised to get this habit of reading. Tried to find any book on Shri Lal Bahadur Shastry and Sardar Patel. Could not find. :( Decided to get Started with something that interests me - Politics! The autobiography of Shri L. K. Advani (Lal KishenSingh Advani) - My Country My Life. I am so much fond of reading anything about BJP. So it was a good chance to read and know things about BJP and Shri Atal Bihari Vajpayee through Shri Advaniji's book. Couple of chapters finished where in he has explained his life in Sindh (now in Pak) and life as a RSS swayamsevak etc. Hope to finish all of it soon and get inspired by these two stalwarts of BJP - Shri ABV and Shri LKA.

Also read a book which had 356 quotes from India's greatest philosophers and ShimadBhagavatGita!
They really gave some kickstart and made me think. If few lines from Holy Gita and Vivekananda can tell me so much about about life what would reading all of them do. Confusion?? I dont think so.

Planning to get some of the quotes from them here after I get them copied. Books are the greatest friends on can accompany! Realized books can be the greatest gifts on any occasion.

Leaving office early! (Yes that is not something I do daily so worth mentioning :)). So, Thanks and Good Bye 2012! You were a pain! I will change my attitude with books. So, HAPPY  NEW YEAR 2013!


Regards
Pramod

Tuesday, December 11, 2012

सिलिकॉन व्ह्याल्लीत जा....पण सह्याद्रीला विसरू नको


खालील कविता मी प्रथम माझ्या नववीच्या वर्गात असताना वाचली होती.
त्यावेळी मराठी दैनिक 'सकाळ' सोबत 'युवा' नावाची एक पुरवणी येत असे.
आणि ती पुरवणी आम्हा मुलांमध्ये खूप लोकप्रिय असायची!
त्याच 'युवा' पुरवणी मध्ये मी एकदा वरील मथळ्याची एक भावनिक कविता वाचली.
ती मनाला इतकी भावली कि वाटले आपण कसे तरी त्या कवितेचा भाग आहे!
त्या कवितेचा कटाउट मी त्यानंतर ५ वर्षे सांभाळून ठेवली! पण ती कालांतराने हरवली!
काही वर्षामागे तीच कविता मला एका मित्राकडून इ-मेल  मधून मिळाली. त्यावेळी 'युवा' पुरवणी मध्ये खालील कवितेचा लेखक 'अनामिक' असे नमूद करण्यात आले होते. पण नंतर मला कळले कि हि सुंदर कविता मंदार श्रीराम काळे यांनी लिहिली आहे! त्यांना ह्या त्यांच्या कृतीसाठी अनेक आभार आणि शुभेछ्या.

हे कविता म्हणजे एका मित्राने (लेखकाने?) नोकरीसाठी परदेशी गेलेल्या आपल्या मित्राला माघारी येण्यासाठी घातलेली एक अतिशय भावनिक आणि ह्रिदयाला भिडणारी साद! आशा आहे तुम्हालाही आवडेल!


सिलिकॉन व्ह्याल्लीत जा....पण सह्याद्रीला विसरू नको

व्हिसा stamp झाल्यावरती एकाच धावपळ उडून गेली ।
भवितव्याच्या स्वप्नांनी रे तहान भूक हरवून गेली ।।
भेटी झाल्या, खरेदी झाली, ब्यागसुद्धा भरून झाली ।
सारख्या सूचना देता देता आईंची धांदल उडून गेली ।।
तासामागून तास गेला आणि फ्लाईटची वेळ जवळ आली ।
निरोप द्यायला विमान तळावर सवंगडयांनी गर्दी केली ।।
कौतुक आणि काळजी तुझ्या बाबांच्या चेहऱ्यावर दिसून गेली ।
पाठ तुझी फिरता, त्यांची पापणी सारं बोलून गेली ।।
अरे आपली माती, आपली मानसं, देश आपला विसरू नको ।।१।।

विमान उडालं तेंव्हा एक-एक डोळा पाण्यानं भरला असेल ।
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा मनानं बंड केलं असेल ।।
नकोच जायला परदेशात एकदा तरी वाटलं  असेल ।
अरे अकांक्ष्यांच्या पंखानाही अश्रूंनी जखडून टाकलं असेल ।।
लिंकनचे शब्द आठव, अश्रू ढाळायला लाजू नको ।
गीतेतलाही उपदेश आठव हात-पाय गाळून बसू नको । 
अरे अटकेपार झेंडे लाव पण माय मराठी विसरू नको ।।२।। 

अरे अन्न दिलं, वस्त्र दिलं, सह्याद्रीनच ओसरी दिली ।
आई-बापानं कष्ट करून ज्ञानाची भरून शिदोरी दिली ।।
गुरुजनांनी संस्कार दिले, गावकऱ्यांनी यारी दिली ।
अरे टपरी वरच्या अप्पानही वेळोवेळी उधारी दिली ।।
देश सुटला पोटासाठी बंध इथले तोडू नको ।।३।।

पोटापाण्यासाठी मित्रा दाही दिश्याना जायला हवं ।
दिशा देण्या प्रवाहाला, प्रवाहापुढे पळायला हवं ।।
कासवासारखं विश्वासानं एकेक पाउल टाकायला हवं ।
एखादं स्वप्न देशासाठी आपणही पाहायला हवं ।
व्यावसाहीकतेच्या दुनयेत या भावनानाही जपायला हवं।।
नमस्कार सांग लीबर्टिला पण आई भवानी विसरू नको ।।४।।

स्वर्ग सुखं सगळी मित्रा हात जोडून उभी असतील ।
भुरळ पाडतील तुला आणि मग मर्यादेला हसत बसतील ।।
जीम असेल, क्लब असतील, मैदानंही भरत असतील ।
मंद मंद उजेडात कुठतरी पार्ट्या सुद्धा होत असतील ।।
रॉंक यांड रोलवर बेभान हो पण ताण लताची विसरू नको ।।५।।

पंखात शक्ती आल्यावरती पाखरं दूर उडून जातात ।
आई-वडिलांच्या घरट्यात मग आठवणींची भुतं राहतात ।।
अरे आठवणींची भुतं आईला रोज अश्रूंची भेट देतात ।
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोप सुद्धा पळवून नेतात ।।
आईच्या चरणी परत ये, स्वर्गात सुद्धा रमू नको ।।६।।

वाट पहात मित्र तुझा पानपट्टीवर थांबला असेल ।
मग तुझ्या वाटणीचा ग्लास कुठेतरी पार्टीत तसाच उरला असेल ।।
ब्याट घेऊन पिट्या एकटाच मैदानात उतरला असेल ।
तुझ्याविना संघ महादया, फायनल म्याच हरला असेल ।।
अरे भेटीसाठी तुझ्या इथला प्रत्तेकजन आतुरला असेल ।
आणि आठवणींनी गावच्या कधीतरी तुझाही उर भरून आला असेल ।।
भरारी मार उंच आकाशी, पण मातीचं नातं तोडू नको ।।७।।

वाटत असेल तुलाहि मित्रा सह्याद्रीत परत यावं ।
कामधंदे सोडून सगळे डोंगर दर्यात फिरत राहावं ।।
निशाचरासारखा गुपचूप रात्री रोज बाहेर पडावं ।
मग धाब्यावारती मित्रांबरोबर तासंतास बसून राहावं ।।
क्रिकेट खेळावं डोंगरावरती, दमून भागून घरी यावं ।
झंकारची भेल खावी अन कृष्णामाईचं पाणी प्यावं ।।
अरे क्वाफ़िनाचं पाणी पी पण कृष्णामाईला विसरू नको ।।८।।

परवाच पाहिलं मित्रा आपला सह्यात्रीच रडत बसला होता ।
त्याचा म्हणे हिरा कोणीतरी पश्चिमेला पळवून नेला होता ।।
भवितव्याची स्वप्ने दाखवून राणीच्या मुकुटात ठेवला होता ।
प्रकाशाला त्याच्या आता सह्याद्रीच पारखा झाला होता ।।
सह्याद्रीच्या बुरुजा असा आयत्यावेळी ढळू नको ।
बिझनेस वॉरच्या योद्ध्या असा मैदान सोडून पळू नको ।।
मग नुसताच आवंढा गिळू नको, नुसत्याच मुठी आवळू नको ।।९।।

सह्याद्रीच्या कुशीत मीत्रा मोठी रत्नं होऊन गेली ।
देशासाठी नरदुर्गांनी सर्वस्वाची होळी केली ।।
अरे आपल्यालाही ज्या सह्याद्रीनं विश्वास दिला, प्रेरणा दिली ।
त्याचीच मांडी आज कारे फुटक्या काचांनी भरून गेली ।।
असेल देश गरिब आपला, कचरा म्हणून हिणवू नको ।।१०।।

वडील रागावणार नाही हवंतर                 तू फक्त परत ये ।
आई सूचना करणार नाही                     तू फक्त परत ये ।
मित्र उधाऱ्या मागणार नाही                   तू फक्त परत ये ।
शेजारीही चुगळ्या करणार नाही              तू फक्त परत ये ।
म्याच अर्धी राहिली मित्रा                     तू फक्त परत ये ।
तुझीच ब्याटींग पहिली मित्रा                  तू फक्त परत ये ।


अरे अटलजींचे शब्द आठव                   तू फक्त परत ये ।
टाटा बिर्लांची जिद्द आठव                      तू फक्त परत ये ।
सावरकरांचा त्याग आठव                    तू फक्त परत ये  |
मग गावचा ओसाड भाग आठव              तू फक्त परत ये ।
गावचा गोवर्धन उचलू मित्रा                 तू फक्त परत ये ।
अरे अख्खा देश हलवू मित्रा                  तू फक्त परत ये ।

इच्छा श्रींची सोडू नको, शपथ शिवाची मोडू नको ।
हुतात्म्यांची स्वप्नं अशी डॉलर साठी विकू नको ।।
सह्याद्रीच्या सूर्य असा पश्चीमेला मावळू नको ।।११।।
सिलिकॉन व्ह्याल्लीत जा, पण सह्याद्रीला विसरू नको ।।


                                              - मंदार श्रीराम काळे 

Sunday, December 9, 2012

"जाणता राजा" मधील औरंगजेबने ऐकवलेले शिवाजी राजांचे कौतुक


शिव् शाहिर बाबासाहेब पुरंदरे लिखित भव्य नाटक - "जाणता राजा" मधील मुग़ल बादशाह औरंगजेब ह्याने आपल्या मुलास ऐकवलेले शिवाजी राजांचे कौतुक अणि राज्य करायचे असेल तर शिवाजी सारखे चारित्र्य आचरणात आणन्याचा दिलेला सल्ला!



ये सब फिजूल ही शहजादे! चंगेज़ और तैमुर के खून ने कभी शिकस्त नही देखी! लेकीन आज कंदहार से कांजौर तक सारे हिंदुस्तान को मुघले-ए-सल्तनत में शामिल करणे का ख्वाब देखणे वाले महाबदोलत ये सब क्या देख रहें है! हमारी आंखो के सामने सिवाजी अपने सल्तनत की ताविद कर चूका है! हमारे लाखोँ की फ़ौज को शिकस्त देके खदेड़ दिया है उस सिवा ने!

ये हमारे मामूजा मिर्जा-आमिर-उल-उम्रा नवाब-ए-आलम शाहिस्ता खां साहब! सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे सिवा ने इनके लाल किले पे छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए! ये तो तकदीर के सिकंदर थे, की जान बच गई! सिर्फ तीन उंगलियाँ ही खोनी पड़ी इन्हें! हा हा हा हा हा! ये हमारे सिपहसालार जसवंत सिंह, जोधपुर के महाराजा! मराठो के मार के जखम इन्होने छाती पे नहीं, पीठ पे खाएं हैं! ये हैं सूरत के खुबसूरत सुभेदार इनायत खान बहादुर! सिवाजी सूरत आये तो ये दुम दबा कर के भाग गए! ये हैं हमशी फौलाद खान! इनके हथेली पे मिठाई धर के सिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए! हमारे सारे मनसुबोँ को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने! बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोडके भागने वाले ये हैं हमारे कारतुलब खां! ये हैं नामदार खां! ये तुर्कताज खां! ये बूंदी महाराज हौन्सी गाडा! ये रणमस्त खां! ये केसर सिंह! ये सय्यद पुनवर खां! तमाम सारे राजपूत, बुन्देल, पठान, मुग़ल, तुर्क, ईरानी, बग़दादी, अरबी, हफसी, कजाकी, उज्बेगी और फिरंगी फ़ौज बनसरदार, जिन्हें सिवाजी ने शिकस्त दी! सारी  इज्जत मिटटी में मिला दी!

हाँ! हाँ! तौबा! तौबा! क्योँ? क्योँ सिवाजी को फ़तेह हाशिल हुई? हमारी तरह फ़ौज, बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े, सिवाजी के पास नहीं हैं! फिरभी फ़तेह हाशिल होती है उसे! क्योँ, ये मालूम है तुम्हे शहजादे? शायद तुम ये कभी समज़ नहीं पाओगे शहजादे! औरत, शराब, नाच, गाने,  शिकार, मौज-मस्ती और इश्को-मुहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहाद्दुर सिवा को कभी समज़ नहीं पाओगे!इस सिवाजी ने मजबूत किले बनाये! अपनी फ़ौज और अरसला बधाई! नए जंग-ए-बेहरित की ताविद की है उसने! लेकिन उससे भी जादा, न जीते जाने वाले लोग तैयार किये हैं उसने! हमने सिवाजी के सरदारोँ को लाखोँ के जहागीर लालच दिया! लेकिन उन जांबाज़ मराठो ने हमारी जहाँगीर पर थूक दिया! वोह जुकते, वोह रुकते नहीं, वोह थकते नहीं और वोह बिकते भी नहीं! सिवाजी ख़ाक है! चालाख है! दगाबाज है! नामाकूं है! मग्रुर है! बद्ग़ार है! लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ़ और सूरज की तरह चमकदार है! शहज़ादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फ़कीरो और औरतो की इज्ज़त करना जानता है वोह! तभी तो उसकी इज्ज़त, बुलंद मीनार की तरह सर उठाये आस्मां को छु रही है! इसमे कोई शक नहीं के हम खुशनसीब हैं! हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा! शहजादे, हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो! मगर कुछ भी हो, है तो वोह हमारा दुश्मन! हमें उसे नेस्तनाबूत करना है! हमारी पूरी ताकत लगाके उससे जुजना है! यही खुदा का हुकुम है! 

दिन! दिन! दिन!

धन्यवाद्!
एक शिवभक्त!

Friday, December 7, 2012

Bangaluru - The 'Best City' to live In - My experiences

What made me write something on this topic? Then here it is.

I would not be writing a blog if had not this news made the headings and it wouldn't even have crossed my mind if had not I come across this painful news.

First news came on Dec 4 2012. I was not surprised when I read it all over the media, print as well as social, that Bangaluru (formerly Bangalore) has been declared as the Best City to live in, in a survey. But sometimes things happen just to prove other ones wrong! And it happened! Two days down the line after this 'good' news was published one more shameful act happened in Bangaluru. A North-East woman was groped by mob, harassed. Not just that, for her misfortune when she walked up to a traffic constable in a hope to get help, instead of police helping her, he harassed her and slapped her when she tried to catch hold of the person in guilt (in this case one who hit her car from rear and caused damage).

And when I read the complete story here, it was a deja-vu moment for me. Why shouldn't be?? The kind of same incident had happened with me and my family few months back. And when I think of the time I can imagine I was lucky enough to come out of the incident with not much trauma. This is what happened.

Me, my wife and my mother-in-law were off to visit a temple close to my house in Bangaluru. The temple was around one and half Km from the place I live in. We decided to get into a auto-rickshaw to the place. But to my very expectations, after talking to 6-7 auto drivers none of them were ready to go to the temple on meter. Few of them turned their head away as if I am asking them to take us to Mysore. Nothing surprising! We Bangalureans are very much used to it. But this time it was limit and it was already irritating me. In the process we had walked half the distance. And at one place which happens to be a major traffic signal we saw half dozens of autos parked. I talked to one of the auto driver. With no hesitation he asked for 40 Rs that too when I was speaking Kannada. This was worst it could get. Forty bucks for not even a Km!! I was done with bargaining after couple of requests. I came away from the site and started noting the the auto number on my mobile phone. This, I could not keep away from the sight of the same auto driver I had just spoken to. Seeing this he called me back and asked whether I was ready to pay 30 bucks. I straight away refused and offered 20 Rs (considering the distance to be traveled I thought it wouldn't even run for the minimum meter and it costs 18 Rs in Bangaluru for minimum auto ride). With no surprise he refused. I came aside and started doing what I was supposed to do. Now that's where the auto driver got irked and came charging onto me. He asked me what I was doing and tried grabbing my mobile phone. I retracted and pulled myself aside. He began to shout slang in Kannada and came dangerously on me. By this time I began to realize that he is drunk by the foul smell out of his mouth. My family was around and thought not to get involved with this drunkard. I began to walk away and this gave him a impression may be, that I am scared and running away (I was, actually). Then he attacked me and gave a thump on my chest. DONE! That's max I could hold on. I lost my cool (and conscious as well that I have my loved ones to care about) and gave him what he deserved. A tight SLAP. That was not to prove something but was a natural reaction to a physical abuse. He began to throw more slang. Hearing all this noise other auto drivers came together. They were 4 or 5 in number and without thinking for single moment they all surrounded me and started to beat me. My wife and mother-in-law tried to rescue me. But for my surprise none of the audience came to rescue me. My specs fell down in process. I was still grouped by them. It went for a minute. Then I realized I have my and mom-in-law as they were trying save me. I somehow managed to come out. But the damage was done. I was beaten and I could not find my glasses. I took my family aside for safety. The auto drivers were still hurling abuses at me. I was awestruck, not able to decide what to do next. I walked few meters away with my family. They were completely scared. My wife started crying. I saw two traffic police on the petrol bunk near signal. I thought of complaining but my family resisted to the idea thinking we are not getting involved anymore. To my surprise the traffic police didn't even bother to ask why my wife is crying. But decided to leave the place. I called up my friends in case we were chased. We got in another auto after walking away from the site of incident and reached the place. Got the Darshan and came home with friends on with my friend driving by our side.

The day had ended but it had taught me a big lesson: never negotiate with auto drivers. Since then I have been practicing this thing of not talking to a auto driver if he is not ready to run on meter. I keep on ignoring once refused. There is a system in place to complain about the auto drivers' ill-behaviors. I even had mugged up the auto number. But was doubtful about the system. I know I should have gone ahead with the complaint. But decided not to. They say, सिर सलामत तो पगडी पचास. That's what majority of us think.

That's it about my experience. But there would be hundreds of them have happened. Few of them have happened with my friends. 

This is about what usually happens on road. But there are more things that big buck IT industry has brought to this city. I really big time admit that this is a beautiful city and was really wonderful city few years back. Not that it is not now But you have to watch your steps, then you are safe and happy.

As we all know Bangaluru is a IT hub. Most of them draw a six-digit salary. And thats where the catch is. Auto drivers feel its not a big deal for a normal guy in here to pay more than required and they consider their birth right to hype the charges. And if the person in question happens to be from outside Karnataka then their is no question of going with rules. I don't want to generalize things but this is what most of us come across. I am not from Karnataka and knew a different kind of Kannada. But I decided to learn it. And I am happy to learn it. But not every one know this language and they pay for it. Like in the case of this woman who went through this trauma, she was told she was not from here and hence was thrashed. This happens many times. 

As I proceed to the end of this writing I want to sincerely mention that I have been here for last six years or so. This city has proved to be the best for me. Best atmosphere, cleanest of the cities I have been to. There are a lot more good memories attached with city including my first job and time I had with my friends. I would like to end this on this good note. This city is the best barring some incidents like in above news. This is not the fault of the city. These miscreants are all over, be it anywhere. But I am sure one will find many more good examples to counter them. But apart from this, the city of Gardens has a opportunity to prove it 'the best city' by bringing this cop and the roadies to the justice. That's one hope to end this writing.

Thanks,
Pramod

Sunday, December 2, 2012

Panipat by Vishwas Patil! Some excerpts!


आज विश्वास पाटलांचे पानिपत वाचून झाले! त्यातील काही रक्त खवळून सोडणाऱ्या आणि अभिमानाने उर भरून टाकणाऱ्या अशा काही ओळींचा इथे उल्लेख करावासा वाटतो! साभार: "पानिपत" - विश्वास पाटील!


"कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अती;

तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती II" - गोविंदाग्रज

पानिपत ह्या शौर्यगाथेच्या (त्यास मी तरी कादंबरी म्हणणार नाही) प्रस्तावनेत खुद्द लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या काही ओळी ह्या अशा:

"पानिपत हा ऐन यौवनातील, मस्तवाल, फाकड्या वीरांनी छेडलेला जीवघेणा जंग होता. आमचा शत्रू अहमदशहा अब्दाली हा तेंव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यापैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. ह्या युद्धावेळी त्याची उमर अवघी बत्तीस., तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठावीस, दत्ताजी शिंदे बाविशीचा, विश्वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसरूड न फुटलेल्या वयाची पोरं होती. जेंव्हा देशातील कोणत्याही नदीवर आजच्यासारखे पूल, रस्ते व वाहतुकीची साधने नव्हती, तेंव्हा सुमारे साठ हजार घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणं या खायच्या गोष्टी नव्हत्या.

आम्ही झुंजलो दिल्लीच्या पातशहासाठी, हिंदुस्तानच्या अभिमानासाठी. मात्र दुर्देवानं उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. राजपूत राणे राजस्थानच्या वाळूत लपून बसले. दुर्देवानं या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाटेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन तेथूनच अवकळा सुरु झाली. तरीही भाऊसाहेब पानिपतच्या मातीत गाडून उभे होते. मात्र श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जगले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंघ जाट पंजाबातून कुमक पाठवत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रियापोरांचं, यात्रेकरूंचं लटांबर सोबत असणं हे काळरूढीनच भाऊंच्या पाठीवर लादलेलं ओझं होतं. पण त्यामुळे हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्यानं तीळभर विश्रांती घेतली नाही

शेवटी अन्नान्न दशा झालेली मराठी सेना झाडाची पानं  आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली, कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले यासाठी दुसर्या कोण्या ऐर्यागैर्याची साक्ष काढण्याचे कारण नाही. ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला त्या आमच्या महाशत्रूनच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशहा अब्दालीनच लिहून ठेवलं आहे, 'दक्षिण्यानी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्त्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुन: पुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्फिन्दार (अफगानांच्या महाकाव्यातील कृष्ण-अर्जुन) सारखे वीर मौजुत असते, तर त्यांनी मराठ्यांचा पराक्रम पाहून आश्चर्यानं तोन्डात बोटं घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य होणं व दिसणं अशक्य!"

"बचेंगे तो और भी लडेंगे." - वीर मराठा दत्ताजी शिंदे यमनांच्या हातून वीरमरण येण्यापूर्वी..

"पानिपतच्या मातीला कशाला दोष द्यायचा? आपल्याच मातीचा हा गुणधर्म आहे; वैरी न चिंती ते सगासोयरा चिंती!" - पेशवे सदाशिवभाऊ!

"एकदा उडी घेतली कि, पुन्हा माघार घ्यायची नाही हेच मराठा ब्रीद आहे! शहाच्या डेर्याचे कळस कापणे, वसईच्या किल्ल्याच्या तटाला भिडून त्याला उभ्या जागी वाकविणे, पंचहजारी मनसबदारात उभे केले म्हणून औरंगजेबावर चवताळणे, बेदरकारपणे भरल्या दरबारात त्यांची जीभ ओढायची लालसा बाळगणे, साखळदंडाने जखडून शहाणे सुरीने काळजाचे तुकडे तुकडे केले तरी शरण न जाता संभाजीने मरण पत्करणे, ह्यालाच मराठा ब्रीद म्हणतात! पण का कोणास ठाऊक पार्वती, ह्या मातीचे कोडेच आम्हाला सुटत नाही. शहाच्या डेर्याचे कळस कापणार्या संताजीचा गळा बक्षिसाचा लालसेने वैर्याला नजर करणारे गाद्दरही ह्याच मातीत निपजले. जीवाचा राक्तभात करून लाल किल्ला सर केला असताना लाख-दीड लाखाच्या लालासेसाठी भामट्याच्या हवाली किल्ला द्यायला राजी जालेले पाजी आज इथेच अवतीभवती वावरत आहेत. कधी कधी आम्ही एकटे बसलो कि, आम्हाला वाटते पानिपत ची आमची हि मोहीम काही औरच आहे. मराठी मातीच्या सर्वोच्य सद्गुनांची आणि दुर्देवी दुर्गुनांचा हा सुंदर मिलाफ आहे. उपासपोटी आमची पथके ह्या जागी हिमतीने खाडी आहेत. काळासारख्या वैर्याने पुरता पेच टाकला आहे; पण आपापसातल्या लाथाळ्या, कुरबुरी, भाऊबंदकी तरी मिटलेली दिसते का? आमच्या मराठी मातीची महती काही न्यारीच. यातले खडे बाजूला केले तर ह्या मातीतून भव्य चिरेबंदी याशोमंदिर उभे राहू शकते; पण मातीत मिसळणारे खडे काही वखताला इतके प्रबळ असतात की, ते साऱ्यांचीच माती करून टाकतात!" -  पेशवे सदाशिवभाऊ!

"पानिपतचा प्रसंग म्हणजे मराठी मातीच्या सर्वोच्य सद्गुनांची आणि दुर्देवी दुर्गुणांची निशाणीच! जोवर ह्या मातीत भाऊबंदकीची, बेदिलीची, गद्दारीची बीजे आहेत, जोवर ह्या राष्ट्रात लाचारी आणि लाथाळीला कायमची मूठमाती मिळणार नाही, तोवर मराठी मातीच्या भाळी पानिपताच मळवट पुन्हा पुन्हा भरला जाणार आहे. पानिपत एकदाच नवे तर अनेकदा घडणार आहे." - श्रीमंत नानासाहेब पेशवे 

"अंगावरच्या वस्त्रासारखे केंव्हाही बदलण्याइतके इमान मला स्वस्त वाटत नाही. दिल्या शब्दाला जगण्यासाठी आम्ही आमची जिंदगी नोछ्यावर करू. मला दिलेले इमानप्रमान पाळण्यासाठी माझा धनी पानिपतात मातीत पाय गाडून उभा राहिला. मातीशी मिळाला. त्याच्या पावलावर उधळलेली इमानाची फुलं मी कुण्या लुन्ग्याशिन्ग्याला कशी अर्पण करू? एकदा दिलेल्या इमानासाठी हजारदा मरण पत्करावं लागलं तरी बेहत्तर!" - मराठ्यांचे तोफखाना प्रमुख, भगव्या जरीपटक्याखाली अभिमानाने मरण पत्करणारे, ज्याच्या तोफांच्या नुसत्या आवाजानेच अफगाणी घोडी आणि बादशहा अब्दालीच्या उरात धडकी भरले, ज्याने भगव्याशी इमान राखण्याकरिता आपल्या ८ हजार गरदी सेनेसह प्राण पणाला लावले  असा मराठा वीर, इब्राहीम गारदी!

संदर्भ: पानिपत, लेखक - विश्वास पाटील!

जय भवानी, जय शिवाजी!

एक मराठा!

Thursday, November 29, 2012

Lyrics of "Omkar Garajto" Song from Marathi Movie 'Taryanche Bet'


"ताऱ्यांचे बेट" ह्या चित्रपटातील "ओमकार गरजतो" ह्या गणेश वंदनेचे बोल!
Google वर कुठे मिळाले नाही म्हणून Blog वर टाकतो आहे!
हे गीत आणखी मोहक वाटते जेंव्हा ते आपण सुरेश वाडकर ह्यांच्या स्वरात ऐकतो! अप्रतिम!

ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सकल गुणेश्वर तू भवतारक मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
तू प्रज्ञा तू विवेक माझा, मी करता तू कर्म प्रेरणा!
तुझ्या कृपेचा दे माझ आशिष, गौरी नंदन मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ओमकार गरजतो नाद  अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
तुझ्या पदी मी दिन  शरणागत, मी पापी तू पाप विनाशक!
रंग  तुझा दे छंद मला, विघ्नविनाशक मोरया!
ओमकार गरजतो नाद अनाहत, मंगल मूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
ओमकार गरजतो नाद  अनाहत, गौरी नंदन मोरया!
गणपती बाप्पा मोरया!


धन्यवाद!
शापित!

Tuesday, November 27, 2012

आजीस पत्र!

।। श्री ।।


प्रिय आजीस,
शी. सा. नमस्कार.

        ह्या आधी शाळेत असताना बरीच पत्र लिहिली. पण हे पत्र लिहितानाची धड-धड आणि धडपड हे त्या वेळच्या पत्रापेक्ष्या कितीतरी वेगळे, अधिक आहे.

        पत्रास कारण कि तू जाऊन आज २६ नोव्हेंबर ला १५ दिवस झाले. आजच घरून बन्गलोरे ला आलो आणि एकटेपणाचे ढग दाटू लागले. घरी होतो म्हणून नव्हे तर तुझ्या आठवणीचे वारे मनात घोंगावत आहेत. आता तू म्हणशील असा कुठे तूला रोज उठून विचार पूस करायचो! पण म्हणतात ना माणसे लांब गेली कि त्यांची किंमत कळते. पण त्यासाठी ती इतक्या दूर जावी लागतील कि परतीच्या वाटा बंद होतील, ह्याची कल्पना नवती. मी तुझ्याशी फोनवर कधीतरी संवाद करायचो. हेही माझ्यासाठी बोचणी ठरते आहे. असो. तू समोर असतीस तर तुला हे सर्व बोलणे कृत्रिम वाटून तुझा एक हलकाच पण प्रेमळ टोमणा हि मला बसला असता, "जारे भाड्या, जास्त माया नको दाखवू".

        तुझ्याबद्दल लिहिताना कुठून सुरुवात करू हेच लक्ष्यात येत नाही आहे. माझ बालपण जास्ती करून होस्टेल वर गेल आणि तुझी जास्त सोबत भेटली नाही. तुझ्यापेक्षा माझी गट्टी तशी आप्पांशीच जास्त असायची. पण तुझ्या रुसव्या-फुगाव्या चे काही किस्से नक्की आठवतात. तुझ रुसून जाऊन देवळात बसने आणि आक्काच्या हजार मिनत्या करून देखील जेवायला घरी न येन काही नवीन नवते. फार लांब जायला नको. हे तुझ लहान मुला सारखा रुसन-फुगणं अगदी परवा परवा पर्यंत दिसायचा. पण ते सर्व क्षणिक. तुला मनवायला बापुतात्याना नि तात्यांना जास्त वेळ  लागायचा नाही. मला आठवतंय बर्याच वेळा तूला रुसलेला पाहिल आणि मी मूड मध्ये असलो कि तुझे गाल धरून चेष्टा केली कि तुझा राग कुठच्या कुठे गायब होऊन त्याची जागा तुझ प्रेमळ आणि मन भरून टाकणार हसू घ्यायच. खंत एवढीच कि हि कल्पना मला हल्लीच सुचली होती. आणि मन दुखी होत कि मी तुला असा फार वेळा हसवू शकलो नाही. मला आठवतंय काही वेळा रात्री झोपी जाण्या अगोदर मी तुझी अशीच चेष्टा केली होती आणि तू अगदी निश्चल हसली होती. भरपूर वेळ. तुला हसलेल पाहून घरात एकाच हश्या पिकायचा. त्याच काय तुझ्या सोबतच्या माझ्या थोड्या फार आठवणी मनाच्या कोपऱ्यात घर करून बसल्या आहेत. गेली पंधरा दिवस तुझा हसरा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतोय. मग दिवस कसा हि गेला असेल तुझी आठवण येऊन डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहिल्या नाहींत. अगदी आताही.

        तू जशी रागीट होतीस त्याच्या कितीतरी पटीने प्रेमळ होतीस् ह्यास कोणी नाकारू नये. तू गेलीस आणि मी पाहिले असतील नाना जातीची माणसे तुझ्या बद्दल प्रेम व्यक्त करून गेली. मग त्या नन्ही गल्लीतील बायका असोत वा महार वाड्यातील असोत. सर्वांची तू कधी न कधी त्या रस्त्यावर नुसत्या दिसल्या तरी केलेली विचारपूस त्या सर्व बोलून दाखवतात. हे झाले माणसांचे. माझ बालपण आणि तुला जोडनारी एखाधी कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे प्राणी-पक्षी. तुझं सनी आणि डॉली (आपले पाळीव कुत्रे) वरील प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मग ते सनीला हाताने भरवलेला घास असो नाहीतर डॉलीला मारले म्हणून तुझे तात्यांवर रागावणे असो. सर्व काही जसच्या तसं आठवतंय. ह्याला आणखी एक कारण म्हणजे ते दोन्ही माझे खूप प्रिय होते. मग कधी कधी वाटतं माझं प्राण्याबद्दलच प्रेम हे तुझ्यापासून उपजतच आल असेल. किती आठवणी! तुझं त्यांना वेळेवर जेवण दे हे सांगणं (मग ते आधीच दिलेलं असेल तरी). त्यांना बांधून घालू न देणं. उठ सुठ त्यांची साखळी सोडून देनं. ह्यातच तुझा आनंद असावा बहुदा आणि साहजिकच माझाही. राकेश कडे तुझ्या जेवढ्या आठवणी आहेत त्या कोणाकडे क्वचितच असाव्यात. साहजिकच आहे. तो कधीच घर सोडून गेला नाही आणि शेवट पर्यत तुझा सहवास त्याला लाभला. मग ह्याच कारणाने का होईना मला कधी कधी त्याचा हेवा वाटतो. नशीबवान तो! त्याने मला सांगितले तू देवळातील आलेलं धान्य (तांदूळ, ज्वारी वगेरे) मुठ-मुठ भरून चिमण्यांना अंगणात घालायचीस. आणि मी कल्पना करू शकतो  त्यांना ते तांदूळ खाताना बघून तुझ्या चेहऱ्यावरील तो आनंद. तुला प्राण्यांचा आणि कुत्र्यांचा किती लळा होता ह्याचे अनेक किस्से तू मला माझ्या बालपणी ऐकवले अशील. मग तो गजुतात्यानी शेतातून आणलेला मुंगुस (ज्याला तू विठ्या म्हणायचीस) असो किंवा आपल्या घरातील एका फोटोतील तुझा प्रिय कुत्रा असो. आणि त्यांचाही तुझ्यावरील किती प्रेम असेल ह्याची कल्पना मी करू शकतो. कोण कुठल ते धनगराच पुरातून वाट चुकून आलेल कुत्र, आजही घर सोडून जात नाही. आणि जेंव्हा ते दारात येऊन भाकरीची वाट बघत तेंव्हा वाटतं ते तुझीच वाट बघतय कि काय. तूच कारण अशील ज्याने ते अबोल जीव गल्ली सोडून अजून गेलं नाही. त्याला कल्पनाहि नसावी तू त्याला आता कधीच दिसणार नाहीस ते.

        तुझ्याबद्दल बोलत असेन आणि तुझ्या मैत्रिणींची बात निघू नये हे होऊच शकत नाही. तुझ्या अनेक मैत्रिणीना मी जवळून पाहिलय. वाडीकरांची सखू आजी, कोळ्यांची लक्साजी, समोरची वचिला आजी, मुसलमानाची गुलशन आजी. ह्यांच्यासोबतच्या तुझ्या आठवणीचा विषय निघाला तर वेळच कमी पडावा. सखू आजीचा नातू परवाच सांगत होता, तुझ्या जाण्याने जणू तिझ्यावर दुखाचा आभाळ कोसळलं. ती  म्हणे रात्री १० वाजेपर्यन्र्त ओक्साबोक्शी रडत बसली होती. आणि गेल्या १५ दिवसात दर एका दिवस आड ती आपल्या घरी येते आणि आणि मन हलक होऊपर्यंत बोलत बसते. तिझ मन मोकळे पनाने ऐकून घेणारा जणू देवच हरवला आहे. तुझ्या आणि तिच्या आपल्या घरातील भेटीचे किस्से आजही बोलले जातात आणि त्यातून तुझ्या  आणि सखू आजी मधला जिव्हाळा कळून येतो. तिचा घरी अल्यावर तुझा चहासाठी आग्रह करण. आणि मग तुमच्या तासंतास चालणाऱ्या  गप्पा. काय ते तुम्हा दोघीनाच माहित. तेच लक्सा आजीच देखील. तिचे अडखळत चालणारे पाय आजही नकळत आपल्या घराकडे वळतात आणि आणि तू घरात नाहीस ह्या  जानिवाने तिझे डोळे ओले करून जातात. आठवतं मला वचिला आजीचं पहिलीतील मुला प्रमाणे तुला पेपर मधील बातम्या वाचून दाखवणं. आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण देनं. ती आली होती आत्याचं आणि आमच सांत्वन करायला. आणि तिझ् एक वाक्य मनात काहुरच माजवून गेलं. ती  वडिलांना म्हणाली, "काय सांगू रे पका, तुमच्या आयुष्यात 'आई' शब्दच नाश पावला की रे." ते ऐकून मन अगदी सुन्न झाले. आणि  तात्या सोबत माझ्याही मनाचा बांध सुटला. गुलशन आजीला बहुदा तुझ्या जाण्याची खबर नसावी नाहीतर ती तीर्डीवरून हि उठून आली असती तुला शेवटचा पहायला. लहान पणी अनेक वेळा ती घरी आल्यावर तू आम्हा पोरांना बोलावून घेऊन तिला नमस्कार करायला लावायाचीस. आणि मग प्रत्तेकाकडे एकेक न्हाणे देऊन तू आम्हाला घरातील मधल्या भिंतीवर ते देवांचे नाम स्मरण करून चीकटवायला लावायाचीस. चिकटला तर देवाने ऐकले असे गुलशन आजी सांगायची,  नाही तर आहेच आणखी एक प्रयत्न. न्हानं चिकटलेल पाहून तुला नक्कीच प्रसन्न वाटत असणार.

        मी अनेक वेळा सुट्टीत गावी आलो कि चिंच, पेरू, जांभूळ आणायला जायचो. आठवणीने तुझ्यासाठी एक गोड इलायची चिंच, एखादा पिकलेला पेरू किंवा मऊ  जांभूळ न विसरता  आणायचो. आणि तेही तू अगदी आवडीने खायचीस. जुन्या ब्रह्मनाथाच्या देवळा मागचे पेरूचं झाड आजही आठवते. पिकलेला पेरू पाहिला कि तुझी व त्या झाडाची आठवण आल्या बगेर राहणार नाही. नक्कीच! तुला लहानपणी बर्याच वेळा चिरमुरे बारीक वाटून दिल्याचे आठवते. ते तुला खायला सोपे जावे म्हणून. तुझ्या हातावरच्या भाकऱ्यांची मला भारीच आवड होती! त्या भाकऱ्या आता परत नशिबी नाहीत! तात्या आणि गजुतात्या तुझ्या भाकर्याबद्दल भरभरून सांगतात. एक खाल्ली कि दुसरी मागायची गरजच भासू नये! तू त्यांच्या मास्तरांना करून घातलेल्या जेवणा बद्दल च्या आठवणी ते सांगायला विसरत नाहीत! आणि ते मास्तर हि विसरनार नाहीत!
       
        देऊळ आणि दुकान ह्यापलीकडे तुझ जाणं नव्हतच. पण गावातील हरेक खबर तुझ्या कानावर यायची ह्याचा मला अजून हि नवल वाटतंय. प्लॉट मध्ये काय लावलय आणि कश्याची झाडे आहेत आणि ती किती वाढली आहेत हे तुला अचूक माहित असायच. तेही तिथ न जाता हे सांगायला नकोच. गंगू ताई ने तिच्या शेतात काय माळवे लावले आहे ह्याची खबर तुला असायची आणि तिने पहिले फळ तुलाच नैवेद्य म्हणून द्यावे हा तुझा प्रेमळ व तितकाच हक्काचा  आग्रह असायचा. नाही दिले तर तिची खैर नसे. देवळात आजही मुले दंगा करू लागली कि तुझी आठवण आल्यशिवाय राहत नाही. मग लोक सांगतात तुझा खणखणीत आवाज त्या पोराना बाहेर पडायला लावायचा. असे अनेक वेळा तू मला रागावल्याच मला आतादेखील स्पष्ट आठवतंय. आणि तुझा रागावणं हे सरळ भाषेत असेल तर मग त्यात नवल कसलं! मी गावभर हुदडून अगदी घराच्या मागे लघुशंका केली तर तू बोलायचीस, "गाव फिरुन्न येतंय आणि घरात मुत्तय"! तसेच घरचे  एखादे काम करण्यास नकार ऐकला कि तुझा आवाज घुमत असे, "खादिला खार आणि भूमीला भार"! अश्या अनेक म्हणी मधून तू आम्हाला आयुष्याचे बरेच धडे दिलेस. काटकसर मी जरी तात्यांकडून शिकलो असलो तरी त्याचे मुळ तूच होतीस. दुसर्यावर जास्त अवलंबून न राहणे हे तू आयुष्यभर पाळलेस.

        तू तुझ्या आयुष्यातील अनेक कठीक प्रसंगाचे वर्णन करताना तू अगदी डोळ्यासमोर उभी राहायचीस. मग मन उगीच त्या तुझ्या तरुण वयातील काळात भरारी मारायचे आणि तुला व तुझ्या सहा मुलांना सांभाळ करताना तुझी होणारी ससेहोलपट याचे चित्र समोर उभे राहायचे. मग शंकर काकांचा विषय निघाला कि तुझे डोळे भरून यायचे आणि तुझ्या त्या जाड भिंगाच्या चाळशीच्या (ती तुझी चाळशी मी माझ्यासोबत घेऊन आलो आहे, तुझी आठवण म्हणून) मागे डोळ्यांच्या कडा पुसायला तुझा पदर हळुवार जायचा. शंकर काकाला झालेला आजार आणि त्या वेळी अप्पांचे बाहेर गावी जाणे आणि त्यातच त्यांचे निधन हे सर्व सांगताना तुझा धीरगंभीर झालेला आवाज आठवतोय. तुझ्या पायांची दुर्दशा कशी झाली हे मग तू आम्हा मुलाना कैक वेळा सांगितले असशील. ह्या सर्व गोष्टी ऐकल्यावर माझेही मन भरून यायचे. मग वाटायचे मी किती सोपे जगणे जगतोय आणि स्वताचीच कीव यायची.

        तुला दवाखान्यात भेटायला आलो. ती आपली शेवटची भेट असेल याची तिळमात्रही  कल्पना मला नवती. तू तुझे पोटाचे दुखणे बोलून दाखवलस.  तुला तो प्राणवायू चा मास्क त्रास करत होता आणि तू मी तो काढावा म्हणून सांगत होतीस. तुला त्या स्थितीत बघून अंगात कापरे भरले. एका मनाला वाटले तुला ह्याची गरज नाही व तू आता लगेच उठून जेवण करशील. मग दुसरं मन त्या आजू बाजूच्या मशीन बघून घाबरून गेलं. तुझा घसा कोरडा पडला होता आणि तुला पाणी हवे होते. ते सिस्टर ने  तुला पाजले. तुझे तोन्ड पुसायाचीही माझी हिम्मत होत नवती. न जाणो काहीतरी चूक केली तर?? तेही मी प्रज्ञाला सांगितले. मी एक क्षुद्र असल्याचा भाव झाला!  एवढा शिकून देखिल मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. मी तुला विचारले कि "कोण आले आहे सांग बघू?" तु तिला ओळखलेस. तेच तुझे शेवटचे बोल माझ्या कानात अजून हि घुमत आहेत, "मला माहित आहे रे, तुझी बायको आली आहे ते." तू बरी होशील याच भोळ्या आशेने आम्ही रात्री घरी निघून गेलो. पण ते होणे नवते. सकाळी फोन आला आणि मन सुन्न झाले. तू गेली होतीस. अगदी कायमची! गाडीतून तुला मी घरी घेऊन जाताना ठरवले होते रडायचे नाही! पण तुला शेवटचा दंडवत घालताना आणि अग्नी द्यायच्या आधी पाणी देताना मनाचा बांध फुटला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुझे दोन्ही गाल हाताने हळुवार दाबले! पण तू हसली नाहीस आणि मला रडू आवरले नाही!

        तुला अनेकदा मी भले बुरे बोललो असेन. त्याची माफी मागावी एवढी माझी पत नाही. शक्य असेल तर माफ कर. सगळे तुझी फार आठवण काढतात ह्यात शंकाच नाही! तुला चिरशांती लाभो आणि तुझे आशीर्वाद सतत सोबत असो हीच प्रार्थना.

        आजी, धन्य आहेस तू आणि धन्य तुझा जन्म! तूझ्या सोबतच्या अशा अनेक आठवणी आणि तू दिलेल्या शिकवणी आम्हाला कायम उमेद देत राहतील! तू जरी नसलीस तरी तुझ्या ह्याच आठवणीत तू अजून जिवंत आहेस आणि राहशील!

म्हणतात गेलेली मानसं परत येतात! येशील का तू माझ्याच पोटी?? तुझ्या उपकाराचे पांग फेडायची एक संधी घेऊन!

तुझा प्रिय(!) नातू,
बंडू.