Popular Posts

Sunday, December 2, 2012

Panipat by Vishwas Patil! Some excerpts!


आज विश्वास पाटलांचे पानिपत वाचून झाले! त्यातील काही रक्त खवळून सोडणाऱ्या आणि अभिमानाने उर भरून टाकणाऱ्या अशा काही ओळींचा इथे उल्लेख करावासा वाटतो! साभार: "पानिपत" - विश्वास पाटील!


"कौरवपांडव संगरतांडव द्वापरकाली होय अती;

तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती II" - गोविंदाग्रज

पानिपत ह्या शौर्यगाथेच्या (त्यास मी तरी कादंबरी म्हणणार नाही) प्रस्तावनेत खुद्द लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या काही ओळी ह्या अशा:

"पानिपत हा ऐन यौवनातील, मस्तवाल, फाकड्या वीरांनी छेडलेला जीवघेणा जंग होता. आमचा शत्रू अहमदशहा अब्दाली हा तेंव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यापैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. ह्या युद्धावेळी त्याची उमर अवघी बत्तीस., तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठावीस, दत्ताजी शिंदे बाविशीचा, विश्वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसरूड न फुटलेल्या वयाची पोरं होती. जेंव्हा देशातील कोणत्याही नदीवर आजच्यासारखे पूल, रस्ते व वाहतुकीची साधने नव्हती, तेंव्हा सुमारे साठ हजार घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणं या खायच्या गोष्टी नव्हत्या.

आम्ही झुंजलो दिल्लीच्या पातशहासाठी, हिंदुस्तानच्या अभिमानासाठी. मात्र दुर्देवानं उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. राजपूत राणे राजस्थानच्या वाळूत लपून बसले. दुर्देवानं या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाटेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन तेथूनच अवकळा सुरु झाली. तरीही भाऊसाहेब पानिपतच्या मातीत गाडून उभे होते. मात्र श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जगले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंघ जाट पंजाबातून कुमक पाठवत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रियापोरांचं, यात्रेकरूंचं लटांबर सोबत असणं हे काळरूढीनच भाऊंच्या पाठीवर लादलेलं ओझं होतं. पण त्यामुळे हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्यानं तीळभर विश्रांती घेतली नाही

शेवटी अन्नान्न दशा झालेली मराठी सेना झाडाची पानं  आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली, कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले यासाठी दुसर्या कोण्या ऐर्यागैर्याची साक्ष काढण्याचे कारण नाही. ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला त्या आमच्या महाशत्रूनच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशहा अब्दालीनच लिहून ठेवलं आहे, 'दक्षिण्यानी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्त्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुन: पुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्फिन्दार (अफगानांच्या महाकाव्यातील कृष्ण-अर्जुन) सारखे वीर मौजुत असते, तर त्यांनी मराठ्यांचा पराक्रम पाहून आश्चर्यानं तोन्डात बोटं घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य होणं व दिसणं अशक्य!"

"बचेंगे तो और भी लडेंगे." - वीर मराठा दत्ताजी शिंदे यमनांच्या हातून वीरमरण येण्यापूर्वी..

"पानिपतच्या मातीला कशाला दोष द्यायचा? आपल्याच मातीचा हा गुणधर्म आहे; वैरी न चिंती ते सगासोयरा चिंती!" - पेशवे सदाशिवभाऊ!

"एकदा उडी घेतली कि, पुन्हा माघार घ्यायची नाही हेच मराठा ब्रीद आहे! शहाच्या डेर्याचे कळस कापणे, वसईच्या किल्ल्याच्या तटाला भिडून त्याला उभ्या जागी वाकविणे, पंचहजारी मनसबदारात उभे केले म्हणून औरंगजेबावर चवताळणे, बेदरकारपणे भरल्या दरबारात त्यांची जीभ ओढायची लालसा बाळगणे, साखळदंडाने जखडून शहाणे सुरीने काळजाचे तुकडे तुकडे केले तरी शरण न जाता संभाजीने मरण पत्करणे, ह्यालाच मराठा ब्रीद म्हणतात! पण का कोणास ठाऊक पार्वती, ह्या मातीचे कोडेच आम्हाला सुटत नाही. शहाच्या डेर्याचे कळस कापणार्या संताजीचा गळा बक्षिसाचा लालसेने वैर्याला नजर करणारे गाद्दरही ह्याच मातीत निपजले. जीवाचा राक्तभात करून लाल किल्ला सर केला असताना लाख-दीड लाखाच्या लालासेसाठी भामट्याच्या हवाली किल्ला द्यायला राजी जालेले पाजी आज इथेच अवतीभवती वावरत आहेत. कधी कधी आम्ही एकटे बसलो कि, आम्हाला वाटते पानिपत ची आमची हि मोहीम काही औरच आहे. मराठी मातीच्या सर्वोच्य सद्गुनांची आणि दुर्देवी दुर्गुनांचा हा सुंदर मिलाफ आहे. उपासपोटी आमची पथके ह्या जागी हिमतीने खाडी आहेत. काळासारख्या वैर्याने पुरता पेच टाकला आहे; पण आपापसातल्या लाथाळ्या, कुरबुरी, भाऊबंदकी तरी मिटलेली दिसते का? आमच्या मराठी मातीची महती काही न्यारीच. यातले खडे बाजूला केले तर ह्या मातीतून भव्य चिरेबंदी याशोमंदिर उभे राहू शकते; पण मातीत मिसळणारे खडे काही वखताला इतके प्रबळ असतात की, ते साऱ्यांचीच माती करून टाकतात!" -  पेशवे सदाशिवभाऊ!

"पानिपतचा प्रसंग म्हणजे मराठी मातीच्या सर्वोच्य सद्गुनांची आणि दुर्देवी दुर्गुणांची निशाणीच! जोवर ह्या मातीत भाऊबंदकीची, बेदिलीची, गद्दारीची बीजे आहेत, जोवर ह्या राष्ट्रात लाचारी आणि लाथाळीला कायमची मूठमाती मिळणार नाही, तोवर मराठी मातीच्या भाळी पानिपताच मळवट पुन्हा पुन्हा भरला जाणार आहे. पानिपत एकदाच नवे तर अनेकदा घडणार आहे." - श्रीमंत नानासाहेब पेशवे 

"अंगावरच्या वस्त्रासारखे केंव्हाही बदलण्याइतके इमान मला स्वस्त वाटत नाही. दिल्या शब्दाला जगण्यासाठी आम्ही आमची जिंदगी नोछ्यावर करू. मला दिलेले इमानप्रमान पाळण्यासाठी माझा धनी पानिपतात मातीत पाय गाडून उभा राहिला. मातीशी मिळाला. त्याच्या पावलावर उधळलेली इमानाची फुलं मी कुण्या लुन्ग्याशिन्ग्याला कशी अर्पण करू? एकदा दिलेल्या इमानासाठी हजारदा मरण पत्करावं लागलं तरी बेहत्तर!" - मराठ्यांचे तोफखाना प्रमुख, भगव्या जरीपटक्याखाली अभिमानाने मरण पत्करणारे, ज्याच्या तोफांच्या नुसत्या आवाजानेच अफगाणी घोडी आणि बादशहा अब्दालीच्या उरात धडकी भरले, ज्याने भगव्याशी इमान राखण्याकरिता आपल्या ८ हजार गरदी सेनेसह प्राण पणाला लावले  असा मराठा वीर, इब्राहीम गारदी!

संदर्भ: पानिपत, लेखक - विश्वास पाटील!

जय भवानी, जय शिवाजी!

एक मराठा!

2 comments:

  1. पम्या भावा आपल्याला लहानपणी "एकीचे बळ" असा एक धडा होता .. ज्यात लाकडाची मोळी केली कि ती तुटू शकत नाही पण एकटी काठी कोण पण तोडू शकतो. या उभ्या महाराष्ट्रातल्या राजकारणात एक शरद पवार सोडून कुणीच हि गोष्ट लक्षात ठेवली नाही :-(

    ReplyDelete
    Replies
    1. barobar bhava! takat vaghakade aste pan to chatur nasato....kolhyakade takade nasate pan to chatur ani dhurt asto..!

      hach kay to farak!

      Delete