Popular Posts

Monday, January 9, 2017

BHIM App!

If you can't move a mountain move a rock.
Spent the day educating shop owner and vegetable venders in my area on the usage and benefits of BHIM app. Most of them were using Paytm and/or POS machines. Glad to receive a very supportive and positive response. Biggest plus is none of them felt burdened on this issue of going cashless. People are optimistic. Even the smallest of small vender. There is hope!
Will cover more people in coming days as some of them were not equipped or available. Stay positive!

Pramod
08/01/2017


Image may contain: 2 people, beardImage may contain: 2 people, beard, glasses and indoor

Thursday, January 5, 2017

Contentment!

When you are at Hotel Pai at Anandrao circle, Bangalore, you can't miss out on two things. The Jawar Roti meals and this old lady in the video who works there. We have been seeing her for so many years now that I could not resist but have a word with this 'Amma', which I always wanted to do. Speaking to her, you know at her age any normal working being would have retired a decade back. She has a son who does not stay with her. I am not quite sure if I heard it right, blame my poor Kannada, she said she also has a mother to look after. That means leading almost a lonely life with no certainty of what future lies ahead of her. But all these things are not big enough to take away her smile from her. She seems content. People like these are living example for many of us who get depressed over not having enough things to lead a happy life. I would have spoken to her more had I not got a bus to catch. Nevertheless there are more journies to come and we will see her as always. Solid like a rock and ever smiling. #JoyOfGiving


माज!


गावाकडं बैलाला बैलगाडीला जुपायच्या किंवा शेतकामाला लावायच्या आधी एक काम केलं जातं.
त्याचा माज उतरवला जातो. का? तर त्याचं लक्ष फक्त कामावर असावं आणि एखादी गाय बघितली तरी त्याला डिस्ट्रकशन येता कामा नये. नाहीतर हा बैल काम सोडून वाऱ्यावर सोडलेल्या पालव्यावणी फुर्रर फुर्रर करत चावताळत सुटायचा.
शहरातल्या लोकांना माहित आहे कि नाही माहित नाही पण गावाकडं सगळी बघतात नेमका माज उतरवणे म्हणजे काय. तर त्याचा पुरुषत्वच नासवतात. आता बऱ्या पैकी इंजेकशन वगैरे आले असतील ज्याने बैलांना जास्त त्रास नाही होत पण आधी असल्या सोप्या पद्धती नव्हत्या. तर बैलाला पाय बांधून पाडलं जायचं. तुम्ही चपलांना कधी खिळा ठोकताना पहिला असेलच. खास करून पायताण ला. ज्या प्रकारे चप्पल शिवणारा ते चप्पल एका लोखंडी सपाट गोष्टीवर ठेऊन वर चिक्की मोळा लावून त्यावर हातोड्याने ठोकतो तसाच बैलाच्या गोट्यापण अश्याच सपाट लोखंडी/दगडी गोष्टीवर ठेऊन त्याच्या वर दणका देतात आणि गोट्या सपाट. पार चक्का चूर.
आता हे असला अश्लील कशाला सांगायलोय? तर वेळच तशी आलीय. हे जे रोज घडतंय ना, काल दिल्ली मध्ये आज बंगलोरला, उद्या मुंबई मध्ये तर पर्वा परत दिल्ली ला! हे माजलेले लोक बायकांची छेड काढतात. कशाची भीतीच नाही. मोकाट सुटतात. पुढच्या वेळी परत तेच करतात.
लोकशाही आहे, कोर्ट कचेरी आहे. केस होते. शिक्षा पण होते. पण उशिरा. ठोस असा उदाहरण काही समाजासमोर उभा राहत नाही. शिवाजी महाराजांनी केलं होतं तसं काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणतो त्यांनी फक्त हात कापले होते आता गोट्या ठेचून खटक्यावर एकदाच बॉट ठेवायला पाहिजे. असंही सरकार आणि कोर्ट काय करत आहेत? हेही करून बघा.
बाकी गावाकडं खमके बैल पण कसे एकदम निवांत काम करताना पहिलेच असेल. पहिला नसतील जाऊन बघा.
- आलासकर

Monday, January 2, 2017

मी त्याला फॉलोव करतो


म्हणून काय झालं, मी त्याला फॉलोव करतो.
तो म्हणतो स्वच्छता राखा, घाण करू नका,
मी कधी झाडू हातात घेतलाच नाही,
म्हणून काय झालं, मी त्याला फॉलोव करतो.
तो म्हणतो योग करा, प्राणायाम करा,
कसला काय राव, वेळ कोणाकडे आहे,
म्हणून काय झालं, मी त्याला फॉलोव करतो.
तो म्हणतो दान धर्म करा, समाजाला वेळ द्या,
मला फक्त 'धर्म'च कळतो, दान काय असतंय माहित नाही,
म्हणून काय झालं, मी त्याला फॉलोव करतो.
तो म्हणतो खादी बघा वापरून, आपलीच आहे,
ते कोण घालणार घाटी म्हणतील,
म्हणून काय झालं, मी त्याला फॉलोव करतो.
तो निघाला शाकाहारी, टिटोटल्लर (निर्व्यसनी)
आपल्याला बुआ झिंगल्याशिवाय जमतच नाही.
म्हणून काय झालं, मी त्याला फॉलोव करतो.
सुचलं ते लिहिलं. Do not mind, just being little sarcastic and cynical!

स्वच्छ भारत

स्वच्छ भारत

बंगलोर हुन गावी चाललो होतो. चिक्कोडी ते शिरगुप्पी च्या वाटेवर बस होती. बस नेहमी पेक्षा लवकर पोहोचत होती. सकाळ ची वेळ. रस्त्यावर जास्त काही वाहने नव्हती. पण रस्त्याच्या बाजूला मात्र बरीच हालचाल दिसत होती. कळायला जास्त वेळ लागला नाही. सकाळ आताच झाल्यानं लोक प्रातविधी साठी हातात तंब्रेल घेऊन बसले होते. काहींचं सौशोधन सुरु होतं. काही परतत होते. ह्या वाटेवर बऱ्यापैकी खेडीच त्यामुळे स्वाभाविक वाटले. शिरगुप्पी मध्ये ड्रॉप झालो. फादर आले घ्याला. निघालो. शिरगुप्पी ते आलास दरम्यान दोन आणखी गावे. आलास महाराष्ट्र मध्ये तर बाकीची हे तीन गाव कर्नाटकात. शिरगुप्पी ते जुगुळ काही वेगळं नव्हतं. रस्ता एकदम मस्त. चिक्कोडी चे खासदार भारी कर्तबगार. रस्ते चोख बांधून दिलेत. पण लोक त्याहून हुशार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हागुण राठ. जुगुळ म्हध्ये पोहोचलो तर परिस्थिती अजून हलाखीची. डोकं हालायची वेळ आली. जुगुळात तर सार्वजनिक सौचालयाची सोय. पण लोक कदाचित रांगोळी प्रेमी असावेत. रस्त्यावर तर हक्कानं पण ह्या सार्वजनिक सौच्यालयच्या भवतीनं आपली कलाकारी दाखवलेली. ज्यांना जायचे असेल त्यांची पण वाट वहिवाट! न राहवून फादर ला विचारले की हे असं का होतंय. एवढी सोया असून लोक सिमेंट काँक्रेट च्या रस्त्यावर का . आणि एवढ्या लोकांकडे संडास नाही का घरी? फादर पण वैतागलेलं. अगदी चढ्या आवाजात बोलले, "नाहीत कसं? सगळ्यांकड हाईत. रांडची तरीपण रस्त्यावरच हगत्यात." डोकं फिरायची वेळ आली. संडास असून रस्त्यावर? खरे लॉजिक तर पुढे होते! मी विचारले, असं का? उत्तर - "भांडं भरतंय म्हणून वापरतच नाहीत". आता मात्र मेंदू चा बर्फ झाला. पुढे मंगावती गावात गाडी घातलीच नाही. परत खासदार साहेबांचे आभार. गावा बाहेरूनच बंगलोर च्या रस्त्यांना लाज वाटावी असा रस्ता बांधलाय. त्यामुळे त्या गावाच्या लोकांची कलाकुसर अनुभवायचा योग नाही आला. गावापतूरचा बाकी रस्ता शेतातून गेलाय.त्यामुळे काही त्रास झाला नाही. आमचंही गाव आधी असंच होतं. पण आता परिस्तिथी बऱ्यापैकी आहे. ह्यात सरकारचा काही हात नसावा. लोकांनाच मूळ गाभा कळलं नाही तर कितीही हागणदारी मुक्त आणि स्वच्छ भारत च्या गप्पा मारा, काहि उपयोग नाही. सरकार ला दोष देणं सहज सोयीस्कर वाटतं. पण काम लै जिकिरीचं आहे.
असाच एक अनुभव म्हणून संगीतलो. शक्य असल्यास आणि धीर असल्यास भांडं कसं भरत नाही ह्याचं लॉजिक एकाला तरी सांगा. उघड्यात हगल्यावर रोग पसरतात हे सरकार सांगतच आहे, पण त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही. मीही प्रयत्न करेन. 😀 


धन्यवाद. - आलासकर
२३ डिसेंबर २०१६.

शेतकऱ्याला इयरली हाईक

शेतकऱ्याला इयरली हाईक,

काल शनिवार, गावचा आठवडी बाजार. भाज्यांचे सरासरी दर असे, टोमॅटो - रु10/किलो, वांगी - रु 30 ते 40 /किलो, फुल गोबी कुठं 5 ला 2 गड्डे आणि अगदीच चांगला माल असेल तर 10 ला दोन, गवारी रु 40/ किलो, शेवगा 5 ला 4, पालेभाज्या 10 ला 4 पेंढ्या. आणि हे सर्व व्यापाऱ्या कडचे दर. आणि ह्या दरावर पण सर्रास मागामागी सुरूच होती. बाकीच्या भाज्या पण काही खास महाग नव्हत्या. हे असे दर बाजारात असतील तर शेतकऱ्याला काय भावाने विकाव्या लागत असतील?
आता जरा दुसऱ्या बाजूकडे येऊया. कोणताही नोकरदार वर्ग असो त्याला वर्षाकाठी नाही म्हंटले तरी 10 % तरी पगारवाढ हवीच असते. मग तो माझ्या सारखा तुच्या सॉफ्टवेअर इंजिनिर असो नाहीतर सरकारी कर्मचारी असो. कोणाला इयरली हाईक हवी तर कोणाला वेतन आयोग हवा. मग शेतकऱ्यालाच का असं वाटू नये. मी गेली काही वर्षे, नाही म्हंटलं तरी 5-6 वर्षे बाजार करतोय. भाज्यांचे दर काही काळ वगळता हे असेच आहेत. आणि जे कधी ते वाढले ते फक्त साठेबाजी मूळे वाढले म्हणजे त्याचा फायदा हा पिकावणाऱ्याला न होता दलालांचाच झाला. मी डाळ आणि साखरे विषयी बोलत नाही पण त्यांचंही काही वेगळं नाही.
का, शेतकऱ्याला काही स्वप्ने नसतात? त्याला मुलांचं शिक्षण नसतं? घरात सण नसतात? मुलींची लग्न नसतात? स्वतःचा घर खर्च? जेंव्हा इतर लोकांचा पगार आणि मिळकत वाढते तर साहजिकच शेतकऱ्याचा पण ह्या सर्व गोष्टींचा खर्च पण वाढतो. मग त्यानं का हाईक किंवा वेतन आयोग सारख्या गोष्टींची अपेक्षा करू नये? च्या आयला जरा भाज्यांचे दर वाढले की लागले मारायला बोंब! आणि ह्या वाढीतला मोठा भाग हा दलाल लोक खाणार? मग शेतकरी का झक मारायला शेती करतो काय? काय त्यानं आपलं पालन करायचा ठेका घेतला आहे?
मुळात सरकार कोणतंही असो शेतकर्याबाबत सगळे दुर्लक्ष करतात? त्यात जनता भिकार(खास करून नोकरदार वर्ग). सरकार दर ठरवत नाही, दलाल निम्मा फायदा आयता खातो आणि भिकार आमच्यासारखे मेथी सोबत कोतमिर चार काड्या द्या असं हात पसरवणारे. का नाही सरकार भाज्यांचे दर स्थिर करू शकत? का त्या भाज्यांचे दर वर्षाकाठी 10-15 टाक्यांनी वाढवत? आता म्हणतील गरीबाला कसं परवडणार. अरे मग त्यासाठी दुसरा उपाय करा ना. गरिबाला मोबाईल परवडत नाही म्हणून कधी कंपन्यांनी त्याचे दर कमी केले का? मग शेतमालाचे दर का कमी? गरिबाला परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला का वेठीस धरले जावे? आणि त्याला गरीब करणार का? ज्या गोष्टी न मिळाल्याने माणसाला फरकच ना पडो असल्या गोष्टींचे दाम ढगात? आणि जे खाऊन जगतो किंवा नाही मिळालं तर तुमच्या आयुष्याला खीळ लागेल त्याचे मात्र दाम कायम खड्यात नाहीतर दलालांच्या मर्जीवर? कवा पतूर चालणार असं! कि शेतकरी नक्सली झाल्यावर थांबणार हे?
काही जणांना वाटेल उसाला लई भाव आहे. गैरसमज आहे. पहिला तर उसाला भाव कसा आणि कवा मिळालं हे माहिती पाहिजे. त्याच्या आधिपण त्यात सुद्धा लुटच झाली. शेट्टी आले आणि चित्र थोडं का होईना बदलले. आता शेट्टी पण कुत्र्याची शेपूट झाले. हे झालं ऊसाचे!
उपाय काय करावं? मी काय शेतकरी न्हवं खरं बा शेतकरी आणि शेती कसं करायचं ह्याच ज्ञान नसलं तरी शेतमालाला दर किती असावा हे ठरवायला कशाला हवंय सायन्स? ज्यात पिकवणाऱ्याला फायदा होईल आणि त्याची प्रगती खुंटणार नाही असं दर द्या बास. त्यात सरकार आणि आपण जनता दोघांनी सहकार्य करायला हवं. दलालांच्या पेकाटात पहिली लाथ बसली पाहिजे. हे सरकार करेल तवा करेल. आपण काय करू शकतो? निदान जे लोक निवांत कमावत आहेत ते. दळभद्रयागत मागामागी न करावी. जमल्यास शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल घ्यावा(ह्याचा उलटा अर्थ काढू नये. व्यापाऱ्याला जर चांगला पैसा मिळाला तर तो पुढे शेतकऱ्याला पण जाईलच. ) अजून जरा घाला, ह्याच्या बरोबर ते जरा घाला असलं कर्मदारिद्री पणा करू नये. मी पाहिलंय हे सगळं. बंगलोर मध्ये पण. 10 डिजिट पॅकेज वाले पण करतात. गावात तर व्यापारी लोक पण काय लई मोठे व्यापारी नसतात. बहुतांशी बेचाऱ्या म्हाताऱ्या बायका नाहीतर मुस्लिम बागवान असतात. लोक अक्षरशा जीव मेटाकुटीला आणतात त्यांचा मागामागी करून. ह्या बायका कमवणार काय आणि जिथून आणलंय त्याला देणार काय. मग जरा जणांची आणि मनाची दोन्ही पण बाळगा.
बाकी सरकार डावे काय आणि उजवे काय? शेतकऱ्याची गांड पण धुवायच्या पात्रतेचे नसते. मी ह्या सरकार चा खंदा समर्थक पण ह्या बाबतीत हे लोक पण कुत्र्याचीच शेपूट. कुत्रं कोण ते विचारू नका. आपलं काम करा. पुढच्या वेळी शेतमाल घेताना अगदी मॉल म्हध्ये जाता तसंही नाही गेलं तरी चालेल पण जे दर तुम्ही देताय त्याच्यावर कुटुंब अवलंबून आहेत हे लक्षात असू द्या. शेवटी दुसऱ्याच वरबडून आपलं भरण्यात काय जीव? बाकी आपण रोज ज्ञान देणारे विडिओ पाहतोच आणि सेंटी होऊन share आणि फॉरवर्ड पण करतो त्यामुळे आपण सुज्ञ आहात. 😜
अन्नदाता सुखी भवः।
- आलासकर
२५ डिसेंबर २०१६.