Popular Posts

Monday, January 2, 2017

स्वच्छ भारत

स्वच्छ भारत

बंगलोर हुन गावी चाललो होतो. चिक्कोडी ते शिरगुप्पी च्या वाटेवर बस होती. बस नेहमी पेक्षा लवकर पोहोचत होती. सकाळ ची वेळ. रस्त्यावर जास्त काही वाहने नव्हती. पण रस्त्याच्या बाजूला मात्र बरीच हालचाल दिसत होती. कळायला जास्त वेळ लागला नाही. सकाळ आताच झाल्यानं लोक प्रातविधी साठी हातात तंब्रेल घेऊन बसले होते. काहींचं सौशोधन सुरु होतं. काही परतत होते. ह्या वाटेवर बऱ्यापैकी खेडीच त्यामुळे स्वाभाविक वाटले. शिरगुप्पी मध्ये ड्रॉप झालो. फादर आले घ्याला. निघालो. शिरगुप्पी ते आलास दरम्यान दोन आणखी गावे. आलास महाराष्ट्र मध्ये तर बाकीची हे तीन गाव कर्नाटकात. शिरगुप्पी ते जुगुळ काही वेगळं नव्हतं. रस्ता एकदम मस्त. चिक्कोडी चे खासदार भारी कर्तबगार. रस्ते चोख बांधून दिलेत. पण लोक त्याहून हुशार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हागुण राठ. जुगुळ म्हध्ये पोहोचलो तर परिस्थिती अजून हलाखीची. डोकं हालायची वेळ आली. जुगुळात तर सार्वजनिक सौचालयाची सोय. पण लोक कदाचित रांगोळी प्रेमी असावेत. रस्त्यावर तर हक्कानं पण ह्या सार्वजनिक सौच्यालयच्या भवतीनं आपली कलाकारी दाखवलेली. ज्यांना जायचे असेल त्यांची पण वाट वहिवाट! न राहवून फादर ला विचारले की हे असं का होतंय. एवढी सोया असून लोक सिमेंट काँक्रेट च्या रस्त्यावर का . आणि एवढ्या लोकांकडे संडास नाही का घरी? फादर पण वैतागलेलं. अगदी चढ्या आवाजात बोलले, "नाहीत कसं? सगळ्यांकड हाईत. रांडची तरीपण रस्त्यावरच हगत्यात." डोकं फिरायची वेळ आली. संडास असून रस्त्यावर? खरे लॉजिक तर पुढे होते! मी विचारले, असं का? उत्तर - "भांडं भरतंय म्हणून वापरतच नाहीत". आता मात्र मेंदू चा बर्फ झाला. पुढे मंगावती गावात गाडी घातलीच नाही. परत खासदार साहेबांचे आभार. गावा बाहेरूनच बंगलोर च्या रस्त्यांना लाज वाटावी असा रस्ता बांधलाय. त्यामुळे त्या गावाच्या लोकांची कलाकुसर अनुभवायचा योग नाही आला. गावापतूरचा बाकी रस्ता शेतातून गेलाय.त्यामुळे काही त्रास झाला नाही. आमचंही गाव आधी असंच होतं. पण आता परिस्तिथी बऱ्यापैकी आहे. ह्यात सरकारचा काही हात नसावा. लोकांनाच मूळ गाभा कळलं नाही तर कितीही हागणदारी मुक्त आणि स्वच्छ भारत च्या गप्पा मारा, काहि उपयोग नाही. सरकार ला दोष देणं सहज सोयीस्कर वाटतं. पण काम लै जिकिरीचं आहे.
असाच एक अनुभव म्हणून संगीतलो. शक्य असल्यास आणि धीर असल्यास भांडं कसं भरत नाही ह्याचं लॉजिक एकाला तरी सांगा. उघड्यात हगल्यावर रोग पसरतात हे सरकार सांगतच आहे, पण त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही. मीही प्रयत्न करेन. 😀 


धन्यवाद. - आलासकर
२३ डिसेंबर २०१६.

No comments:

Post a Comment